Tatayan | टाटायन | Girish Kuber | गिरीश कुबेर | Marathi Book Review | मराठी पुस्तक समीक्षण



लेखक गिरीश कुबेर 
पृष्ठसंख्या ४१९
प्रकाशन राजहंस प्रकाशन
समीक्षण आकाश जाधव
मूल्यांकन ४ | ५


'टाटा' हे नाव न ऐकलेली व्यक्ती कदाचित भारतात शोधून सापडणार नाही. भारतीयांसाठी 'विश्वास' या शब्दाचा समानार्थी 'टाटा' हा शब्द आहे. आज टाटा समूह फक्त भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात पसरलेला आहे. कित्येक क्षेत्रांत टाटा समूह प्रथम क्रमांकावर आहे, पण त्याबद्दल आपण सर्वच अनभिज्ञ आहोत.

लेखक गिरीश कुबेर यांनी टाटा समूहाच्या स्थापनेपासून ते अगदी अलीकडे रतन टाटा - सायरस मिस्त्री यांच्यापर्यंत या समूहाबद्दल लिहिले आहे. हा कालखंड १०० वर्षांपेक्षा जास्त मोठा आहे. पुस्तकातील असंख्य घटना भारतातील आणि जगातील वेगवेगळ्या भागांत घडलेल्या आहेत. पुस्तकात तत्कालीन व्यक्तिमत्त्वांची रेलचेल आहे, ब्रिटिश कालीन संदर्भ आहेत, आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील राजकीय पार्श्वभूमी आहे. या पुस्तकाचा व्याप एकूणच प्रचंड आहे, आणि तो गिरीश कुबेर यांनी समर्थपणे पेलला आहे. असं उत्कृष्ट पुस्तक मराठी भाषेत लिहिल्याबद्दल त्यांचे आपण कौतुक करायला हवे.

नुसेरवानजी टाटा (जमशेटजी टाटा यांचे वडील) यांनी मुंबई गाठली, आणि कसलाही अनुभव अथवा अर्थसहाय्य पाठीशी नसताना व्यवसाय सुरू केला आणि टाटा समूहाचा पाया रचला. पुढे जमशेटजी टाटा, ज्यांना आपण आज भारतीय उद्योगविश्वाचे भीष्म पितामह म्हणून ओळखतो, यांनी या व्यवसायाचा विस्तार केला. जगात कोठेही जलविद्युत निर्मितीकेंद्र नसताना टाटा समूहाने ते अथक परिश्रमाने उभारले. टाटा समूहाच्या दूरदृष्टीमुळेच भारतात पोलाद उद्योग सुरू झाला. मुळात, टाटा हे भविष्याचा विचार करत होते. देश बांधण्यासाठी सक्षम उद्योग उभे करणे गरजेचे आहे, हे त्यांनी काळाच्या आधीच ओळखले आणि त्याची तयारी देखील केली.

पुस्तक वाचताना नावांमध्ये गफलत होऊ नये, समजण्यास सोपे जावे म्हणून टाटांचा कौटुंबिक वृक्ष दिला आहे. उद्योगांव्यतिरिक्त, टाटा कसे होते, हे देखील लेखकाने जागोजागी विशद केले आहे. पुस्तकात कोणताही एक नायक नाही, तरीपण ज्यांनी टाटा समूह पुढे नेला, त्या सर्वांबद्दल लिहिले गेले आहे आणि प्रत्येकाला योग्य न्याय देण्यात आला आहे. पुस्तकात कृष्णधवल छायाचित्रेही दिली आहेत आणि शेवटी गिरीश कुबेर यांनी रतन टाटांची घेतलेली मुलाखत देखील आहे.

टाटा समूहाचा विस्तार होत असताना जे.आर.डी. यांना प्रचंड संघर्ष करावा लागला, आणि त्याचे कारण होते तत्कालीन राजकीय वर्तुळ आणि लायसेन्सराज. टाटा समूहाने खरी भरारी घेतली तेव्हा भारताने खुली अर्थव्यवस्था स्वीकारली, आणि आज टाटा एक बलाढ्य उद्योगसमूह म्हणून नावारूपास आला आहे. पुस्तकात टाटा स्टील, एअर इंडिया, टाटा मोटर्स, टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस या कंपन्यांच्या जन्मकथा आहेत. त्याशिवाय पहिली भारतीय बनावटीची मोटर म्हणजे इंडिका आणि नॅनोची जन्मकथा देखील आहे.

'टाटायन' हे पुस्तक प्रत्येक भारतीयाने वाचावे असेच आहे. या उद्योगसमूहावर याहून सविस्तर माहिती असलेले पुस्तक शोधून सापडणार नाही, त्यामुळे हे पुस्तक एकदा जरूर वाचा.




संबंधित व्हिडिओ


2 Comments

  1. Tatayan Book Review in Hindi:


    ‘टाटा’ नाम की अनसुनी कोई व्यक्ति शायद भारत में ढूंढने पर भी न मिले। भारतीयों के लिए 'विश्वास' शब्द का पर्याय 'टाटा' है। आज टाटा समूह सिर्फ भारत में ही नहीं, बल्कि पूरी दुनिया में फैला हुआ है। कई क्षेत्रों में टाटा समूह पहले स्थान पर है, लेकिन इसके बारे में हम सभी अनजान हैं।
    लेखक गिरीश कुबेर ने टाटा समूह की स्थापना से लेकर हाल ही में रतन टाटा - साइरस मिस्त्री तक इस समूह के बारे में लिखा है। यह कालखंड १०० वर्षों से भी अधिक लंबा है। पुस्तक में असंख्य घटनाएं भारत और दुनिया के विभिन्न हिस्सों में घटित हुई हैं। पुस्तक में उस समय के प्रमुख व्यक्तित्वों का समावेश है, ब्रिटिश काल के संदर्भ हैं, और स्वतंत्रोत्तर भारत की राजनीतिक पृष्ठभूमि भी है। इस पुस्तक की व्यापकता बहुत बड़ी है, और इसे गिरीश कुबेर ने कुशलतापूर्वक संभाला है। इस तरह की उत्कृष्ट पुस्तक मराठी भाषा में लिखने के लिए उनकी सराहना की जानी चाहिए।
    नुसेरवानजी टाटा (जमशेदजी टाटा के पिता) ने मुंबई का रुख किया, और बिना किसी अनुभव या वित्तीय सहयोग के व्यापार शुरू किया और टाटा समूह की नींव रखी। बाद में जमशेदजी टाटा, जिन्हें हम आज भारतीय उद्योग जगत के भीष्म पितामह के रूप में जानते हैं, ने इस व्यापार का विस्तार किया। जब दुनिया में कहीं भी जलविद्युत उत्पादन केंद्र नहीं था, टाटा समूह ने इसे अथक परिश्रम से खड़ा किया। टाटा समूह की दूरदृष्टि के कारण ही भारत में इस्पात उद्योग शुरू हुआ। वास्तव में, टाटा भविष्य की सोच रहे थे। उन्होंने समय से पहले ही यह पहचान लिया था कि देश के निर्माण के लिए मजबूत उद्योगों की आवश्यकता है, और इसकी तैयारी भी की।
    पुस्तक पढ़ते समय नामों में भ्रम न हो और इसे समझना आसान हो, इसलिए टाटा परिवार का वंश वृक्ष दिया गया है। उद्योग के अलावा, टाटा कैसे थे, इसे भी लेखक ने कई जगह स्पष्ट किया है। पुस्तक में कोई एक नायक नहीं है, फिर भी जिन्होंने टाटा समूह को आगे बढ़ाया, उन सभी के बारे में लिखा गया है और प्रत्येक को न्याय दिया गया है। पुस्तक में श्वेत-श्याम चित्र भी दिए गए हैं, और अंत में गिरीश कुबेर ने रतन टाटा का साक्षात्कार भी लिया है।
    टाटा समूह का विस्तार होते समय जे.आर.डी. को काफी संघर्ष का सामना करना पड़ा, और इसका कारण था तत्कालीन राजनीतिक माहौल और लाइसेंस राज। टाटा समूह ने असली ऊंचाई तब हासिल की जब भारत ने खुली अर्थव्यवस्था को अपनाया, और आज टाटा एक विशाल उद्योग समूह के रूप में उभरा है। पुस्तक में टाटा स्टील, एयर इंडिया, टाटा मोटर्स, टाटा कंसल्टिंग सर्विसेज जैसी कंपनियों की जन्म कहानियाँ शामिल हैं। इसके अलावा पहली भारतीय निर्मित कार, इंडिका, और नैनो की भी जन्म कहानी है।
    'टाटायन' पुस्तक हर भारतीय को पढ़नी चाहिए। इस उद्योग समूह पर इससे अधिक विस्तृत जानकारी वाली पुस्तक ढूंढने पर भी नहीं मिलेगी, इसलिए इस पुस्तक को एक बार जरूर पढ़ें।

    ReplyDelete
  2. Tatayan Book Review in English:

    It would be difficult to find a person in India who hasn't heard the name 'Tata.' For Indians, the word 'Tata' is synonymous with 'trust.' Today, the Tata Group is not only spread across India but around the entire world. In many sectors, the Tata Group holds the top position, but we remain largely unaware of this.
    Author Girish Kuber has written about the Tata Group from its inception up until the recent era of Ratan Tata - Cyrus Mistry. This period spans over 100 years. The book covers countless events that took place in various parts of India and the world. It features prominent personalities of the time, references to the British colonial era, and the political backdrop of post-independence India. The scope of this book is vast, and Girish Kuber has managed it expertly. We should appreciate him for writing such an excellent book in Marathi.

    Nusserwanji Tata (father of Jamsetji Tata) arrived in Mumbai and, without any experience or financial backing, started a business and laid the foundation for the Tata Group. Later, Jamsetji Tata, who is today known as the 'Bhishma Pitamaha' (grand patriarch) of Indian industry, expanded this business. At a time when there were no hydroelectric power stations anywhere in the world, the Tata Group built one through tireless efforts. It was due to the Tata Group’s foresight that the steel industry in India began. Essentially, the Tatas were thinking about the future. They recognized long before anyone else that strong industries were essential for nation-building, and they began preparing for it accordingly.

    To avoid confusion over names and to make it easier to understand, a family tree of the Tata lineage is included in the book. Besides their business ventures, the book also sheds light on what the Tatas were like as individuals. While there is no single hero in the book, all those who led the Tata Group have been written about, and each has been given due credit. The book also features black-and-white photographs, and at the end, Girish Kuber has included an interview with Ratan Tata.

    As the Tata Group expanded, J.R.D. Tata faced immense struggles, largely due to the political landscape at the time and the challenges posed by the 'License Raj.' The Tata Group truly soared when India adopted a liberal economy, and today, Tata has emerged as a powerful industrial group. The book includes the origin stories of companies like Tata Steel, Air India, Tata Motors, and Tata Consultancy Services. It also tells the story behind the creation of the first Indian-made car, the Indica, as well as the Nano.

    'Tatayan' is a book that every Indian should read. You won't find another book with such detailed information about this industrial group, so make sure to read this book at least once.

    ReplyDelete
Previous Post Next Post